सार्थ तुकाराम गाथा

म्हणऊनि जालों क्षेत्रींचे संन्यासी – सार्थ तुकाराम गाथा 1515

म्हणऊनि जालों क्षेत्रींचे संन्यासी – सार्थ तुकाराम गाथा 1515

म्हणऊनि जालों क्षेत्रींचे संन्यासी । चित्त आशापाशीं आवरूनि ॥१॥
कदापि ही नव्हे सीमा उल्लंघन । केलें विसर्जन आव्हानींच ॥ध्रु.॥
पारिखा तो आतां जाला दुजा ठाव । दृढ केला भाव एकविध ॥२॥
तुका म्हणे कार्यकारणाचा हेवा । नाहीं जीव देवा समर्पीला ॥३॥

अर्थ

आम्ही भव सागरातील सर्व आशा पाशा पासून आमचे चित्त आवरले आहेत व त्यामुळे आम्ही देहरूपी क्षेत्रांमध्ये संन्यास घेतला आहे. आम्ही सुरुवातीलाच आमच्या चित्ताचे आवाहन केले व त्याचे विसर्जन करून टाकले आता देहरूपी तीर्थक्षेत्र सोडून त्याचे त्या सीमेचे उल्लंघन आम्ही केव्हाही करणार नाही. आता आम्हाला सर्व ठिकाणे परके झाली आहेत आम्ही हरी विषयी एकविध भक्तिभाव ठेवला आहे. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला आता कोणत्याही प्रकारचा कार्य करण्याचा हेवा राहिला नाही कारण आम्ही आमचा जीव देवाला अर्पण केला आहे.


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *