सार्थ तुकाराम गाथा

विभ्रंशिली बुद्धि देहांती जवळी – सार्थ तुकाराम गाथा 1516

विभ्रंशिली बुद्धि देहांती जवळी – सार्थ तुकाराम गाथा 1516

विभ्रंशिली बुद्धि देहांती जवळी । काळाची अवकाळीं वायचाळा ॥१॥
पालटलें जैसें देंठ सांडी पान । पिकलें आपण यातपरी ॥ध्रु.॥
न मारितां हीन बुद्धि दुःख पावी । माजल्याची गोवी तयापरी ॥२॥
तुका म्हणे गळ लागलिया मत्स्या । तळमळीचा तैसा लवलाहो ॥३॥

अर्थ

हा काळ असे काही खोटे चाळे करतो की, मनुष्याने आयुष्यभर जरी चांगले काम केले तरी शेवटी हा काळ त्याची बुद्धी भ्रष्ट करतो. एखाद्या झाडाचे हिरवे पान पिकल्यावर देठासहित गळून पडावे त्याप्रमाणे आपली शेवटी स्थिती होते. एखाद्या हिन बुद्धीच्या माणसाला न मारता त्याची हिन बुद्धी त्याला दुःख देते आणि ती हीन बुद्धी माजल्या सारखी करून त्याला पुन्हा या संसारत गोवते. तुकाराम महाराज म्हणतात ज्याप्रमाणे गळाला लागलेला मासा सारखा तळमळ करत असतो त्याप्रमाणे बुद्धिभ्रष्ट झालेले आणि बुद्धिहीन माणसे सारखे तळमळतात.


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *