सार्थ तुकाराम गाथा

नवजावा तो काळ वांयां – सार्थ तुकाराम गाथा 1517

नवजावा तो काळ वांयां – सार्थ तुकाराम गाथा 1517

नवजावा तो काळ वांयां । मुख्य दया हे देवा ॥१॥
म्हणऊनि जैसें तैसें । रहणी असें पायांचे ॥ध्रु.॥
मोकळें हे मन कष्ट । करी नष्ट दुर्जन ॥२॥
तुका म्हणे कांहीं नेणें । नवजें येणेंपरी वांयां ॥३॥

अर्थ

देवा तुमच्या चिंतना वाचून कोणताही काळ जाऊ नये हीच मुख्य दया तुमची आमच्यावर असू द्यावी. आम्ही जसे आहोत तसे तुमच्या पायाजवळ आहोत म्हणून तुमच्या चिंतना वाचून मोकळे ठेवले तर आम्हाला फार कष्ट होतील. आणि तुमचे जर चिंतन केले नाही तर आम्ही दुर्जन होऊ. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला शास्त्र वगैरे काही माहीत नसले तरी आम्ही वायाला जाणार नाही याची आम्हाला खात्री आहे.


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *