सार्थ तुकाराम गाथा

कल्पतरूअंगीं इच्छिलें तें फळ – सार्थ तुकाराम गाथा 1518

कल्पतरूअंगीं इच्छिलें तें फळ – सार्थ तुकाराम गाथा 1518

कल्पतरूअंगीं इच्छिलें तें फळ । अभागी दुर्बळ भावी सिद्धी ॥१॥
धन्य त्या जाती धन्य त्या जाती । नारायण चित्तीं सांठविला ॥ध्रु.॥
बीजा ऐसा द्यावा उदके अंकुर । गुणाचे प्रकार ज्याचे तया ॥२॥
तुका म्हणे कळे पारखिया हिरा । ओझें पाठी खरा चंदनाचें ॥३॥

अर्थ

एखादा अभागी मनुष्य जरी असला आणि तो मनुष्य कल्पतरू वृक्षाखाली बसला आणि त्याने जी इच्छा केली तरी त्याची देखील इच्छा पूर्ण होईल. ज्यांनी कोणी आपल्या चित्तामध्ये नारायण साठविला आहे ते लोक धन्य आहेत व त्यांच्या जाती धन्य आहेत. पाणी सर्व बिजांना समान प्रमाणात दिले तरी जसे बीज असेल तसेच अंकुर तयार होते व तसे फळ देखील मिळते त्याप्रमाणे नारायण सर्वत्र समान प्रमाणे समावलेला आहे व ज्याचा जसा गुण असेल त्याला तसेच फळ मिळते. तुकाराम महाराज म्हणतात खऱ्या मनुष्याला हिऱ्याची ओळख पटते आणि गाढवाच्या पाठीवर चंदनाचे जरी ओझे दिले असले तरी त्याला चंदनाच्या सुगंधाची ओळख नसते त्याप्रमाणेच चांगल्या मनुष्यालाच नारायणाची ओळख असते त्यामुळे तो सुखी होतो आणि गाढवाच्या पाठीवर जसे चंदनाचे ओझे असते त्याप्रमाणे प्रत्येक मनुष्यरुप गाढवाच्या हृदयात नारायणरुप चंदन असते आणि ज्याला नारायणाची ओळख होते तोच मनुष्य सुखी होतो नाहीतर ओळख न झाल्यास त्या मनुष्याला दुःख प्राप्त होते.


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *