सार्थ तुकाराम गाथा

मान इच्छी तो अपमान पावे – सार्थ तुकाराम गाथा 1567

मान इच्छी तो अपमान पावे – सार्थ तुकाराम गाथा 1567

मान इच्छी तो अपमान पावे । अमंगळ सवे अभाग्याची ॥१॥
एकाचिये अंगीं दुजियाचा वास । आशा पुढें नाश शुद्ध करी ॥ध्रु.॥
अधीक फळासी कोठें पावों शके । वासनेची भिकेवरी चाली ॥२॥
तुका म्हणे राजहंस ढोरा नांवे । काय तया घ्यावें अळंकाराचें ॥३॥

अर्थ

जो मनुष्य आपल्याला मान मिळावा याची इच्छा करतो त्याच्या पदरी अपमान पडतो कारण अभागी मनुष्य कोठेही गेला तरी त्याच्याबरोबर अपयशच असते. एखादयाच्या अंगी एखादा चांगला गुण असला की त्याच्या अंगात एखादा वाईट गुणही असतो आणि अपेक्षेने पुढील नाश होतो हे सिध्द आहे. जास्त फळाची अपेक्षा केली तर ते कुठे लगेच प्राप्त होते आणि वासनेमुळे मनुष्याला भीक मागावी लागते. तुकाराम महाराज म्हणतात, “एखादया पशूचे नाव जर राजहंस ठेवले तर त्या अलंकारिक नावाचे त्या पशूला काही उपयोग आहे काय ?”


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *