sarth tukaram gatha

जातो न येतिया वाटा – संत तुकाराम अभंग – 531

जातो न येतिया वाटा – संत तुकाराम अभंग – 531


जातो न येतिया वाटा । काय निरवितो करंटा ॥१॥
कैसा जालासे बेशरम । लाज नाहीं न म्हणे राम ॥ध्रु.॥
पाहे वैरियाकडे। डोळे वासुनियां रडे ॥२॥
बांधुनियां यमा हातीं । दिला नाहीं त्याची खंती ॥३॥
नाहीं यांपें काम । ऐसें जाणे तो अधम ॥४॥
अझुन तरि मुका । कां रे जालासि म्हणे तुका ॥५॥

अर्थ

एकदा कि माणसाचा जीव गेला की,तो परत येत नाही.तरी देखील मृत्युच्या मार्गाला लागलेला करंटा मनुष्य आपल्या मालमत्येची सोय कशी करावी,इकडे लक्ष देत असतो.आपल्या पश्चात संपत्तीची व्यवस्था कशी करावि, हे पत्नी,मुलांना समजू सांगत असतो.त्या मृत्यु पंथाला लागलेला मनुष्य निर्लज्ज पणामुळे शेवटी देखील राम नामाचा उच्चार कर नाही.हा आपल्या शत्रूंकडे डोळे वटारून पाहतो आणि प्रेमी जणाकडे पाहून आश्रू ढळत असतो.सर्व नातेवाईकांनी त्याला यमाच्या हाती दिले, तरी त्याला काही खेद नसतो.जो अंत काळी देखील प्रेमाने प्रभूचे नामस्मरण करत नाही तो अधम आहे असे जाणावे.तुकाराम महाराज म्हणतात मृत्यूजवळ आला तरी देखील आजून का बरे मुका राहिला आहेस?प्रभूचे अमृतमधुर नाम का बरे घेत नाहीस?


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

जातो न येतिया वाटा – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *