sarth tukaram gatha

तरि कां नेणते होते – संत तुकाराम अभंग – 556

तरि कां नेणते होते – संत तुकाराम अभंग – 556


तरि कां नेणते होते मागें ॠषी । तींहीं या जनासी दुराविलें ॥१॥
वोळती जया अष्टमहा सिद्धी । ते या जनबुद्धी नातळती ॥२॥
कंदमूळें पाला धातूच्या पोषणा । खाती वास रानांतरी केला ॥३॥
लावुनियां नेत्र उगेचि बैसले । न बोलत ठेले मौन्यरुप ॥४॥
तुका म्हणे ऐसें करीं माझ्या चित्ता । दुरावीं अनंता जन दुरी ॥५॥

अर्थ

प्रपंचाच्या भोवऱ्यात रमणाऱ्या लोकां पासून पूर्वीचे ऋषी मुनी दूर राहिले, का बरे त्यांना समजत नव्हते की काय?अष्टमाहा सिद्धी ज्यांच्या चरणांजवळ होत्या ते ऋषी मुनी लोकांच्या प्रमाणे अजिबात वागत नव्हते.ते ऋषी मुनी कंद मुळे पाला खाऊन त्यांनी राना वनात निवास केला.डोळे झाकून बंद करून एका जागेवर स्थिर बसले.काहीच न बोलता त्यांनी मौन व्रत धारण केले.तुकाराम महाराज म्हणतात हे अनंता माझ्या चित्ताला तू अगदी तसेच करावे प्रभू या लोकांपासून मला दूर ठेवावे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

तरि कां नेणते होते – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *