sarth tukaram gatha

गोड जालें पोट धालें – संत तुकाराम अभंग – 692

गोड जालें पोट धालें – संत तुकाराम अभंग – 692


गोड जालें पोट धालें । अवचित वाचे आलें । म्हणतां पाप गेलें । विठ्ठलसें वाचेसी ॥१॥
सत्य माना रे सकळ । उद्धरिला अजामेळ । महापातकी चांडाळ । नामासाठी आपुलिया ॥ध्रु.॥
चित्त पावलें आनंदा । सुखसमाधीतें सदा । म्हणतां गोविंदा । वेळोवेळां वाचेसी ॥२॥
हें जाणती अनुभवी । जया चाड तो चोजवी । तुका म्हणे दावी । रूप तेंचि अरूप ॥३॥

अर्थ

अवचित विठ्ठलाचे नाम मुखी आले ते गोड लागले आणि त्याने पोटच भरले व विठ्ठल म्हणता माझे पाप नाहीसे झाले.तुम्ही सर्वांनी खरे माना कारण महापातकी अजामिळ त्या चांडाळाचा देखील भगवंताने उद्धार केला.नामामुळे त्याचा उद्धार झाला.गोविंदाचे नाम वाचेने वेळोवेळी घेतल्यावर चित्ताला आनंद मिळतो समाधिसुख मिळते.तुकाराम महाराज म्हणतात हेकेवळ संतच अनुभवाने जाणतात व ज्याला गरज आहे तोच हे रूप शोधत असतो.कारण देव हा अरूप असुन रुपास येतो.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

गोड जालें पोट धालें – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *