sarth tukaram gatha

धरितां पंढरीची वाट – संत तुकाराम अभंग – 883

धरितां पंढरीची वाट – संत तुकाराम अभंग – 883


धरितां पंढरीची वाट । नाहीं संकट मुक्तीचें ॥१॥
वंदूं येती देव पदें । त्या आनंदें उत्साहें ॥ध्रु.॥
नृत्यछंदें उडती रज । हे सहज चालतां ॥२॥
तुका म्हणे गरुड टके । वैष्णव निके संभ्रम ॥३॥

अर्थ

जो मनुष्य पंढरीची वाट धरतो त्याला मुक्तीचे संकट नाही.हरीनाम सोहळ्यात हरी चरणांना वंदन करण्यास त्या सोहळ्याच्या उत्सहसाठी आंनदाने देव स्वर्गावरून खाली येतात.वैष्णव जे पंढरपूरला चाललेले असतात त्यांच्या चालण्याने जे त्यांच्या चरणांचे रज उडतात त्याच्या आशेने देव तेथे येतात.तुकाराम महाराज म्हणतात ज्या वैष्णवांच्या हातात गरुड ध्वज आहे तेथे कोणताही संभ्रम न धरता तेच खरे वैष्णव आहेत असे समजावे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

धरितां पंढरीची वाट – संत तुकाराम अभंग – 883

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *