sarth tukaram gatha

आशा ते करविते बुद्धीचा – संत तुकाराम अभंग – 909

आशा ते करविते बुद्धीचा – संत तुकाराम अभंग – 909


आशा ते करविते बुद्धीचा तो लोप । संदेह तें पाप कैसें नव्हे ॥१॥
आपुला आपण करावा विचार । प्रसन्न तें सार मन ग्वाही ॥ध्रु.॥
नांवें रूपें अंगीं लाविला विटाळ । होतें ते निर्मळ शुद्ध बुद्ध ॥२॥
अंधळ्यासी नये देखण्याची चाली । चाले ऐसी बोली तुका बोले ॥३॥

अर्थ
विविध प्रकारच्या विषयांमुळे बुद्धीवर पडदा पडतो व बुद्धीचा लोप होतो आणि संदेह उत्पन्न होणे म्हणजे एक प्रकारचे पापच नाही काय? त्यामुळे आपण स्वतः याविषयी विचार करून पाहावा आणि मन प्रसन्न ठेवावे मन प्रसन्न असणे हेच सर्व गोष्टीचे सार असून मन प्रसन्न आहे किंवा नाही या गोष्टीविषयी देखील मनच साक्षी आहे. आपले मन मुळात हाच निर्मळ शुद्ध बुद्ध होते परंतु नाम वर रूप यांनी युक्त असलेला देह याला “मीपणाचा” विटाळ लागला. तुकाराम महाराज म्हणतात आंधळ्या मनुष्याला स्वतः व्यवस्थित चालता येत नाही डोळस मनुष्य त्याला जसं चालवेल तसे तो चालतो त्याप्रमाणे संत आपल्याला जसे मार्गदर्शन करतील आपण तसे वागावे कारण आपण अंध आहोत व संतांना डोळे आहेत.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

आशा ते करविते बुद्धीचा – संत तुकाराम अभंग – 909

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *